शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:23 IST

कोल्हापूर/ मुंबई : कोल्हापूर, सातारा, लातूर, जालना, नांदेडसह सहा जिल्ह्यांच्या प्रादेशिक विकास आरखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मान्यता दिली.

ठळक मुद्देसन १९७८ मध्ये करण्यात आलेल्या जुन्या आराखड्यासाठी जिल्ह्णाच्या एकूण क्षेत्रफळाच्या २३ टक्के क्षेत्र मंजूर करण्यात आले होते या आराखड्यामध्ये विकास नियंत्रण नियमावली, अभ्यास गटांकडून आलेल्या शिफारशींच्या अहवालाची अंमलबजावणी, जिल्ह्णाचा बृहत् आराखडा, विकास केंद्रांचे सविस्तर नकाशे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा २० वर्षांचा प्रायोजित आराखडा

कोल्हापूर/ मुंबई : कोल्हापूर, सातारा, लातूर, जालना, नांदेडसह सहा जिल्ह्यांच्या प्रादेशिक विकास आरखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मान्यता दिली. यातील कोल्हापूरचा आराखडा पुढील २० वर्षांचा विचार करून सादर केलेला आहे. हा आराखडा मान्य करताना कोल्हापूर आर्किटेक्ट असोसिएशनने घेतलेल्या हरकतींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.कोल्हापूर जिल्ह्याचा प्रारूप प्रादेशिक आराखडा २१ सप्टेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर २३ सप्टेंबरला त्यावर हरकती मागविण्यात येऊन त्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला. या हरकतींवर छाननी करण्यासाठी २ डिसेंबर २०१६ रोजी तिघाजणांची उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीसमोर ४ फेब्रुवारी २०१७ पर्यंत जवळपास ४७०० हरकतींवर सुनावण्या पूर्ण झाल्या.दरम्यान, नागरिकांसह स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींसह आर्किटेक्ट असोसिएशननेही यावर हरकती घेतल्या. यामधील आमदारांसह लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या हरकतींवर दुरुस्ती करून अंतिम आराखडा ३१ मार्च २०१७ रोजी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला.या आराखड्यामध्ये नागरी, ग्रामीण संकुले व तालुका मुख्यालये अशा वीस विकास केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. जुन्या आराखड्याच्या तुलनेत या नवीन आराखड्यामध्ये१७ केंद्रांची भर पडली आहे. सन १९७८ मध्ये करण्यात आलेल्या जुन्या आराखड्यासाठी जिल्ह्णाच्या एकूण क्षेत्रफळाच्या २३ टक्के क्षेत्र मंजूर करण्यात आले होते. त्यामध्ये करवीर, इचलकरंजी व जयसिंगपूर ही विकासकेंद्रे स्थापन केली होती.

आता नवीन आराखड्यामध्ये करवीर, इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल आणि गडहिंग्लज या ठिकाणी नागरी संकुले; हुपरी, कोडोली, हातकणंगले या ठिकाणी ग्रामीण विकास संकुले; शाहूवाडी, गगनबावडा, गारगोटी, आजरा, राधानगरी, चंदगड या ठिकाणी नागरी विकास केंद्रे; बांबवडे, कुंभोज, भादोले, अब्दुललाट, दानोळी, उत्तूर या ठिकाणी नागरी विकास केंद्रे; तर सहा तालुका मुख्यालयांचा समावेश आहे.त्याचबरोबर या आराखड्यामध्ये विकास नियंत्रण नियमावली, अभ्यास गटांकडून आलेल्या शिफारशींच्या अहवालाची अंमलबजावणी, जिल्ह्णाचा बृहत् आराखडा, विकास केंद्रांचे सविस्तर नकाशे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा २० वर्षांचा प्रायोजित आराखडा, इचलकरंजी व काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ता, कोल्हापूर-सांगली राज्य महामार्गाला पर्यायी रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरून रिंग रोड, पर्यटन विकासासाठी रस्त्यांचे जाळे, चांदोली, दाजीपूर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पासाठी बफर झोन प्रस्तावित करण्यात आला आहे.आराखड्यासाठी झाल्या दहा बैठकाजिल्ह्याची नव्याने प्रादेशिक योजना करण्यासाठी १ डिसेंबर २००६ रोजी प्रादेशिक योजना नगररचना उपसंचालक कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. या कार्यालयात नगररचना विभागाचे उपसंचालक मो. र. खान यांनी २०१२ मध्ये पदभार स्वीकारला. यानंतर खºया अर्थाने आराखड्याच्या कामाला गती आली. आराखड्यासाठी आठ अभ्यासगट व सात उपअभ्यास गट तयार करण्यात आले होते आहेत. आराखड्यात या गटांच्या सदस्यांच्या महत्त्वपूर्ण सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला होता. आतापर्यंत या कोल्हापूरच्या आराखड्यासाठी १० बैठका झाल्या. 

उपसंचालक नगररचना कार्यालयाने जो जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा तयार केला होता. त्यावर लोकप्रतिनिधींसह आमदार व नागरिकांनी घेतलेल्या हरकती आल्या होत्या. त्या हरकतींवर दुरुस्ती करून योग्य तो आराखडा या कार्यालयाने सरकारला सादर केला होता. तोच आराखडा जसाच्या तसाच मंजूर झाला. सरकारने त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. उलट आर्किटेक्ट असोसिएशने घेतलेल्या कोणतीही हरकत मान्य न करता त्या फेटाळून लावल्या.- मो. र. खान, उपसंचालक, नगररचना विभाग 

जिल्ह्याचा आराखडा सरकारने मंजूर केल्याचे समजले. या आराखड्याबाबत आर्किटेक्ट असोसिएशनने हरकती घेऊन त्यावर दुरुस्त्या सुचविल्या होत्या. मंजूर झालेल्या आराखड्यामध्ये त्याचा अंतर्भाव झाला आहे की नाही हे माहीत नाही; परंतु आराखडा मंजूर झाल्यानंतर ही सरकार या त्रुटींवर दुरुस्ती करण्यासाठी एक अधिकारी नेमू शकतो, अशी कायदेशीर तरतूद आहे. सरकारने जर हा अधिकारी नेमून पुढील कार्यवाही केली नाही तर आम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल.- राजेंद्र सावंत, माजी अध्यक्ष, कोल्हापूर आर्किटेक्टस असोसिएशन

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाministerमंत्री